क्रोधाला ओळखणे व त्यातून बाहेर येणे
व्यसनापासून लांब राहण्याच्या काळात आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आपण निराश किंवा क्रोधितही होतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीत असेच वाटत असते की आपल्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाही. पण राग येण्यासाठी ही बंधने नसतात. राग कोणावरही आणि कधी ही येतो. राग ही पूर्णतः सर्वसामान्य मनुष्याची भावना आहे. पण जेव्हा हा राग आवाक्याबाहेर जातो त्यावेळेस समस्या तयार होतात. आपल्या वैयक्तिक नातेसंबंधात तसेच आपल्या आयुष्याच्या पुढील मार्गक्रमणातही समस्या निर्माण होतात.
ही गोष्ट आपल्याला विचलित करू शकते.
एकदा एका गावामधे एक मुलगा रहात होता. तो सतत क्रोधित अवस्थेतच असायचा. छोट्या छोट्या गोष्टीत उदास व्हायचा. कधी कधी तर इतरांशी खेकसूनही बोलायचा. त्याच्या वडलांनी एकदा त्याला खिळे आणि हातोडी दिली व सांगितले जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा खिळा भिंतीला ठोकायचा. मुलाने प्रत्येकवेळी राग आल्यावर खिळा ठोकायला सुरवात केली. बराच वेळा खिळा ठोकताना त्याच्या हाताला ईजा होत असे. जेव्हा त्या मुलाने पाहिले की भिंतीवर खूप खिळे ठोकले गेले आहेत तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या रागाचे प्रमाण भरपुर आहे. यावर काही तरी उपाय करावा असेही त्याला वाटू लागले.
काही दिवसांनी तो वडलांकडे आला. वडील त्याला म्हणाले,"तू यातून काय शिकलास?". मुलगा वडलांना हात दाखवत म्हणाला, "मी विनाकारण रागाच्या भरात माझ्या हाताला ईजा करून घेतली याचा अर्थ रागामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते. वडिलांनी त्याला भिंतीवरचे खिळे काढून आणायला सांगितले. मुलाने खिळे काढून आणल्यावर वडिलांनी भिंतीकडे बोट दाखवत विचारले," तुला काय दिसतय". त्यावर मुलगा म्हणाला," भिंतीवर खुप भोक पडली आहेत". लागलीच वडलांनी सांगितले की, "बघ आपल्या रागामुळे फक्त आपलेच नाही तर इतरांचेही नुकसान भरपूर होते. इतरांनाही ईजा होते. क्रोधाने नातेसंबंध संपूष्टात येतात, दोन व्यक्तींमधील विश्वास संपतो, चांगले विचार मरतात आणि आपण स्वतःही विचलित होतो.
ज्या व्यक्तींना क्रोधावर नियंत्रण ठेवता येत नाही असे लोक पुढे आपल्या जवळील नातेसंबधीतांनाही शिवीगाळ करु शकतात. रागावर नियंत्रण नसणा-या पालकांमुळे मुलांवरही परिणाम होतात. सतत क्रोधित राहणा-या व्यक्तींमुळे त्यांच्या सहवासातले इतर लोकही आक्रमक होऊ शकतात.
आपण क्रोधित झालो असल्याचे आपल्याला कधी जाणवते? जेव्हा आपण आरडा ओरडी करतो तेव्हा, जेव्हा आपण एखाद्याला मारहाण करत असतो तेव्हा, किंवा आपण वस्तुंची फेकाफेक किंवा मोडतोड करतो तेव्हा.
"मी संतप्त झालो आहे. मी तुझा तिरस्कार करतो. मला तू आवडत नाहीस... असे वाटते की तुझा सर्वनाश करावा?
जेव्हा आपण असे काही शब्द वापरतो तेव्हा खरतर आपल्यात खदखदत असलेला रागच बाहेर पडत असतो. ब-याचवेळा असही होत की आपल्याला एवढा भयंकर राग आलेला असतो की इतर कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही. आपल्या नकळत आपण आपला राग व्यक्त करण्यासाठी टोकाची भूमिका घेऊ लागतो. आपल्या उपचारानंतर आपण आपल्या व्यसनापासून दुर असतो. आपल्याला व्यसनामुळे ज्या कचेरीतून कमी करण्यात आले होते त्याठिकाणी आपण पुन्हा रुजू होण्यासाठी जातो. आपण आशा धरून ठेवतो की ते त्वरीत रुजू करून घेतील. पण तसे होत नाही. ते आपल्याला उद्या या, पुढच्या आठवड्यात भेटा असे सांगतात, आणि हे असे सुरुच राहते. एकदिवस ते आपल्याला कुत्सितपणे सांगतात की आम्ही आपणास ठेऊन घेऊ शकत नाही. आपली निराशा होते. कामावर घ्यायचे नव्हते तर मग मला इथून तिथे फे-या का मारायला लावल्या? हे आधी सांगू शकत नव्हते का? आपल्याला यागोष्टीचा त्रास होतो, आपले मन दुखविले जाते.
थोड्यावेळाने हे कळते की आपले मन दुखवल्यापेक्षाही रागाची तिव्रता जास्त झालेली आहे. तो राग इतरांवर व आपल्या स्वतःवरही येत राहतो.
आपण हे सर्वकाही आपल्या जवळच्या मित्रांजवळही बोलू शकतो,"मी इतका निराश झालो आहे की मला आत्महत्या करावीशी वाटते". जेव्हा तो मित्र विचारतो,"तु रागावला आहेस का?" आपले नेहमी हेच उत्तर असते की," नाही, मी फक्त उदास झालो आहे." त्यावेळेस खरतर आपणास सर्वकाही हातून निसटल्यासारखे, सर्व आशा संपुष्टात आल्या सारखे वाटत असते. भविष्यातही ही परिस्थिती बदलेल अशी चिन्ह आपणास दिसत नाही. अशावेळेस आपण जर आपल्या आत झाकून पाहिले तर दिसून येते की आपण स्वतःवरच जास्त नाराज झालेलो आहोत.
शांत राहून नाराजी व्यक्त करणे हाही एक रागाचाच प्रकार आहे. यात आपण निष्क्रिय व शांत रहातो. आपल्याला जरी एखाद्या व्यक्तीवर नाराजी किंवा राग व्यक्त करायचा असेल तरी आपले तोंड उघडत नाही किंवा आपल्याला तशी हलचालही करता येत नाही.
रामु म्हणतो," जेव्हा माझी पत्नी ओरडते, मी गप्प रहातो. मी माझ्या समोरासमोर व्यक्त होणा-या रागावर नियंत्रण ठेवायला शिकलो आहे. पण आतमध्ये माझ्यातला असंतोष खदखदत असतो. मी मान्य करतच नाही की मला राग आलेला आहे. मी राग न आल्याचा अभिनय करु लागतो".
जेव्हा रामु तो राग गिळत असतो त्याचा राग संपुष्टात येते नाही. तो सुप्त ज्वालामुखी सारखा बनत जातो. कधी ना कधी त्याचा उद्रेक हा होणारच असतो. असा राग गिळणे म्हणजे ऍसिडने स्वाभिमानावर केलेला शिडकावाच असतो अशावेळेस आपणास व्यसन हाच एकमेव मार्ग असल्याचे जाणवू लागते.
विक्षिप्तपणे किंवा कुत्सितपणे व्यक्त केलेल्या भावनाही रागाच्याच असू शकतात.
एकदा मी घरी आलो तेव्हा पाहिले की माझ्या पत्नीने रात्रीच्या जेवणासाठी दही-भाताशिवाय काहीच बनवलेले नाही. जेव्हा तिने जेवण वाढले तेव्हा मी हसलो आणि म्हणालो, "रात्रीच्या जेवणासाठी काय झक्कास जेवण तयार केल आहेस मला आधी माहित असते तर माझ्या काही मित्रांनाही जेवणाला बोलावले असते नाही का".
आपली ही अजून एक खूप मोठी समस्या असते. अशी प्रतिक्रिया राग या प्रकारातली दिसत नाही पण ती रागाचीच असते. याचे कारण आपण स्वतःला दुर्दैवी, कमनशिबी मानत असतो. आपले कुटुंबिय, आपले मित्र, आपले सहकारी आणि संपूर्ण जगच आपल्या जे पाहिजे आहे, जसे पाहिजे आहे, ज्याची आपल्याला गरज आहे व आपली जी इच्छा आहे ते देऊ शकत नाहीत असे वाटत असते. कधी कधी तर आपल्या मागण्या, इच्छा योग्य आहेत किंवा नाही याचा विचारही करत नाही आणि त्यापूर्ण न झाल्यामुळे राग मात्र येतच असतो. आपले आयुष्य इतरांप्रमाणे नाही याची वारंवार खंत वाटत असते. आपण या जगातील क्रुर व्यक्तींच्या कटात फसलेलो आहोत असे वाटत असते. तसेच आपला नशिबावर फारच भरोसा असतो किंवा दोष द्यायला एक चांगले कारण मिळालेले असते. फक्त कमनशिबीपणा माझ्या वाट्याला आणि चांगले नशिब फक्त इतरांच्या वाट्याला आले असल्याचे वाटत असते.
रागावर नियंत्रण
- Details
- Hits: 8482
1