केव्हा व काय खावे?
प्रत्येक स्त्रीच्या आरोग्य आणि पर्यायाने सौंदर्य याबरोबर हे प्रश्न संलग्न असतात. योग्यवेळी जर योग्य आहार घेतला गेला. तर आपण केवळ निरोगी बनतो असे नाही तर शरीरास अधिक तरतरी व शक्तीदेखील प्राप्त होत असते. यामुळे आपल्याला चांगली झोपही लागते. व त्यामुळेही आपले आरोग्य व पर्यायाने सौंदर्य यांचे जतन होते.
आपल्याला दैनंदीन जेवणांद्वारे आपली भूक तर मिटतेच, परंतू शरीराचे पोषण होते व आपल्याला एक प्रकारचे समाधान देखील प्राप्त होत जाते. म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येकास आपण काय केव्हा व कसे खावे, हे जाणून घेणे जरूर ठरते. म्हणूनच या संदर्भातील पुढील छोट्या पण महत्वाच्या बाबी आपण नक्कीच विसरून चालणार नाहीत.
जेव्हा आपण तीव्र व सौम्य स्वरूपाचा मानसिक तणाव अनुभवत असतो, तेव्हा आपल्या संरक्षण-यंत्रणा नीट कार्य करत नाहीत, तेव्हा आपल्या संरक्षण-यंत्रणा नीट कार्य करत नाहीत. त्यामुळे आरोग्यास धोका पोहोचू शकतो. म्हणूनच अशा वेळी आहारात ‘क’ जीवनसत्व अधिक प्रमाणात घेत जावे. यामुळे भावनिक व मानसिक तणाव कमी होण्यास खात्रीने मदत होईल. तसेच या काळात अधिक कार्बोहैड्रेट असलेले बटाटे, ब्रेड यासारखे खाद्यपदार्थ अधिक खावेत. यामुळे सुरोटॅनिन हे तणाव कमी करणारे जैवरसायन अधिक प्रमाणात स्त्रवते व ताण कमी झाल्याने सौंदर्यास येणारी बाधाही टळते.
काही वेळा विशिष्ट प्रसंगातून जावे लागणार असते. (उदा. इंटरव्ह्यू) व त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात प्रसंगिक तणाव निर्माण होतो. व तो तिच्या सौंदर्यास मारक ठरतो. म्हणूनच अशा वेळी थोड्या गोड पदार्थाचे सेवन करावे. यामुळे शरीरात उत्तेजक पेप्टाइड्स निर्माण होतात व मनावरील ताण कमी होऊन ते प्रसन्न होण्यास मदत होते. पण असे वारंवारच घडत असेल, तर तेवढ्या वेळा गोड खात गेले, तर स्त्रीचे वजनदेखील वाढू शकते हे विसरू नये. व्यायाम करण्याआधी व नंतर तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात जलांश असणे आवश्यक ठरते. व्यायामाआधी सुमारे दिड ते दोन तास १०० ते ३०० कॅलरीच्या दरम्यान कॅलरी असणारे व कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ (पण तेलकट नकोत) खावेत उदा. बिस्किटे, ताज्या फळांचा रस इ. व्यायाम झाल्यानंतर सुमारे वीस मिनिटांनी शरीराचे संतुलन परत आणण्यासाठी पाणी प्यावे व एक तासाने अधिक प्रमाणात कार्बोहायड्रेटस् असलेले पदार्थ खावेत. कारण या दरम्यान शरीरातील ग्लायकोजेन (एक प्रकारची उर्जा) निर्माण करणारे एंझाइम्स् अधिक सक्रिय झालेले असतात व वर सांगितल्यानुसार आहार घेतला, तर शरीर उत्साही आणि तरतरीत राहते.
मासिक पाळी व आहार
या दोहोंचा संबंध स्त्रीचे आरोग्य व सौंदर्य या दोन्हींशी तेवढाच असतो. या कालखांडात जर एखादीस थकवा अथवा शारीरिक परिवर्तन अनुभवास येत असेल, तर तिने अधिक कॅल्शियम असलेले पदार्थ खावेत. उदा. साय काढलेले दूध, कच्ची सॅलड्अस्, बिनसायीच्या दूधाचे गोड दही, हिरव्या पालेभाज्या इ. ज्या स्त्रिया प्रतिदिन १३०० मि. ग्रॅम कॅल्शियम आपल्या आहारात ठेवतात, त्यांना मासिक पाळीच्या आधी येणारा तणाव, चिडचिडेपणा इ. कमी प्रमाणात अनुभवास येतो. चॉकलेट्स, बिस्किटे इ. पदार्थ या काळात खाण्याची इच्छा होऊ शकते व ती पूर्णही करावी, कारण या काळात शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण जरा घटलेले असते व ते बिस्किटे, चॉकलेट्स, हिरव्या भाज्यातून मिळते.
तारूण्यपीटिका व आहार
या दोहोंचा परस्परसंबंध हा स्त्रीच्या सौंदर्याशी निगडीत असतो. काहीवेळा अधिक प्रमाणात तळकट गोड वा बटाटायुक्त पदार्थ खाल्ले, तरच आपल्या त्वचेवर फोड येतात, असे मानणे सर्वस्वी खरे ठरत नाही. आपली त्वचा जर नितळ आणि कांतिमान करायची असेल, तर आपल्या दैनंदिन आहारात आपण विशिष्ट बदल, विशिष्ट खाद्यपदार्थ समविष्ट करणे जरूर ठरते. उदा. टोमॅटो, गाजरे, संत्री, विविध डाळी, झिंकयुक्त खाद्यपदार्थ, शेंगदाणे, तसेच ज्या खाद्यपदार्थात आयोडिनचे प्रमाण जास्त असेल, त्यांचे सेवन करणेही टाळावे.
सर्दी, पडसे व आहार
गळणारे नाक, डोकेदुखी, शिंका या सर्वांचा आपल्या सर्दी व पडशाशी संबंध असतो. यामुळे आरोग्यास संतुलन ढळते व त्याचा परिणाम सौंदर्यावरही होतो. अशावेळेस आपल्या दैनंदिन आहारात पाणी, सफरचंद वा त्यांचा रस अधिक असावा. ताज्या सूप्सचाही आहारात समावेश करावा. पडशाची तीव्रता कमी करण्यासाठी संत्रे, द्राक्षे, स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांचा रस प्यावा. थोडे गरम मसाले असलेले पदार्थही खावेत, कारण या गरम मसाल्यांतून निर्माण होणारे पदार्थ कमी खावेत. कारण यांच्या सेवनामुळे कफ वाढतो.
झोपण्याआधीचा आहार
हा केवळ आपल्याला शांत झोप देण्यास नव्हे, तर त्याद्वारे आपल्या सौंदर्याची जपणूक व वर्धन करण्यास मदत करणारा असतो. झोपण्याआधी खूप जड (पचण्यास) आहार घेणे टाळावे, कारण त्यांमुळे गाढ व शांत झोप लागत नाही. त्याचप्रमाणे चहा-कॉफी या गरम पेयांचे सवेनही टाळावे, कारण त्यातून कॅफिन, टॅनिनसारखे विषजन्य घटक शरीरात जाऊन आपल्या झोपेवर त्यांचा विपरीत परिणाम होतो.
झोपण्याआधी एक टी-स्पून मध वा तेवढाच गोड पदार्थ खावा. यामुळे शरीरात सिरोटॅनिन नामक मधुर असे जैव रसारयन स्त्रवते व त्यामुळेच त्यक्तीस गाढ झोप लागते. जेवढी झोप गाढ, शांत व पुरेशी , तेवढ्या प्रमाणात त्या स्त्रीच्या सौंदर्याची, त्वचेच्या कांतीची जपणूक होते.
शाकाहाराचे महत्व
आजकाल पाश्चात्य संस्कृतीमध्ये देखील शाकाहाराचा पुरस्कार करण्यात आढळतो. पुरातन काळापासून मानव हा अधिक्याने मांसाहारीत होता, हे सिध्द होत आहे . तरीही शाकाहाराचे महत्व हे सु-आरोग्य व पर्यायाने सौंदर्य जतन करण्यास केवढे महत्वाचे ठरते, हे आपण विसरून चालणार नाही. मांसाहार करणाऱ्या व्यक्तींमध्ये अधिक शक्ती व बुध्दिमत्ता असते, असा एक सर्वसामान्य गैरसमज आहे. त्यामुळे शरीरास हानीही पोहचू शकते. कारण मांसाहारातून मिळणारे कोलोस्ट्रॉलख्रेरीज सॅच्यूरेटेड आम्ल घटक असतात व रक्तनलिकांस त्यापासून हानी पोहोचू शकते. याउलट फळे, भाज्या इ. तून भरपूर जीवनसत्वे, कॅल्शिअम व अन्य कार्बोहैड्रेट्स् प्राप्त होत असतात. मांसाहारातून प्राप्त होणारी प्रथिने आपणास सोयाबीन्स् पनीर, दूध, डाळी, घरगुती, लोणी इ. मधूनही प्राप्त होत असतात व ही पचण्यासही तौलनिकदृष्ट्या खूप हलकी असतात.
याखेरीज प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील मांसात काही विषजन्य पदार्थ असू शकतात व यामुळे त्यांचे सेवन करणारी व्यक्ती ही विशिष्ट आजाराची शिकार बनू शकते. मांसाहरी व्यक्तींचे शरीर व बांधा हा शाकाहरींपेक्षा अधिक बोजड व बेडौल असतो व त्यामुळेही त्यांच्या शारीरिक सौंदर्यात बाधा येऊ शकते.
मांसाहर शरीरास अधिक शक्ती, उत्साह व बुध्दीमत्ता देतो, असे मानणे गैर ठरते, कारण त्याच तोडीचा शाकाहरी आहार असू शकतो व तो या सर्व गरजांची पूर्ततादेखील करू शकतो. आपल्या शारीरिक, मानसिक, बौध्दिक व आध्यात्मिक विकासासाठी प्रत्येकीने मांसाहारापासून दूर जाऊन शाकाहारच घ्यावा आणि पर्यायाने आपले सौंदर्य जतन करावे.
स्त्रियांचे सौंदर्यशास्त्र - केव्हा व काय खावे?
- Details
- Hits: 23223
2
महिलांचे आरोग्य
आहार म्हणजे काय?
